राष्ट्रकूट काळातील एक महत्वाचे केंद्र म्हणून कंधार या नगराचा उदय झाला. इ.स.च्या चौथ्या शतकापासून दहाव्या शतकापर्यंत हा विकास चालू होता. राष्ट्रकूट कृष्ण दुसरा याने जलत्तुंग जलाशय निर्माण केला.येथे बौद्ध, जैन व हिंदू कला सारख्याच प्रमाणात विकसित झाल्या.
मध्ययुगीन महाराष्ट्राच्या इतिहासात राजकीय सत्ताकेंद्र व स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने कंधार किल्ल्याचा विकास करण्यात आला. येथे खिलजी, तुघलक, बहामनी, दिल्लीची मुघल सत्ता, हैदराबादचा निझाम यांच्या अस्तित्वाची साक्ष देणाऱ्या वास्तूंविषयीचे तपशील व शिलालेखांच्या नोंदी यांच्यामुळे हे एक उपयुक्त पुस्तक ठरते