इसवी सनाच्या पहिल्या शतकात महाराष्ट्रात सातवाहनांची सत्ता वाढत असताना क्षत्रप घराण्याचा उदय झाला. क्षत्रप हे शक आणि पहलवांच्या बरोबर भारतात आले असावेत. महाराष्ट्र, कोकण, सौराष्ट्र, गुजरात व माळवा या भागात इ.स. पहिल्या ते चौथ्या शतकापर्यंत क्षत्रपानी राज्य केले.
क्षत्रापांचा इतिहास हा लिखित स्वरुपात नसल्यामुळे तो त्यांच्या नाण्यातून दिसतो. या पुस्तकात नाण्यांच्या आधारे क्षत्रप घराण्याचा इतिहास मांडलेला आहे.